Sunday 19 February 2012

हिंसा वर्ज्य आहे

   एकदा स्वामी रामनरेशाचार्य भक्तांना सांगत होते,  आमच्या मठात एक आंब्याचे झाड होते. मठाचे व्यवस्थापक मला म्हणाले, " मी आंब्याचे झाड तोडायला येईन. तेव्हा तुम्ही मला आडवायचं. " मी म्हणालो, " तुम्ही असे का म्हणता ?" ते म्हणाले," या आंब्याच्या झाडाला भीती घालायची. तीन्-चार वर्षे झाली झाड फळच देईना झाले आहे."
     दुसर्‍यादिवशी ते कुर्‍हाड घेऊन आले. म्हणाले," आता तोदतोच याला. काही उपयोगाचे नाही हे झाड. किती वर्षे झाली अजिबात फळच देत नाही. काय करायचे याला ठेऊन?" मी त्यांना रोखलं. "अहो, तोडू नका त्याला. एक वेळ संधी द्या त्याला."  असा आमचा नाटकी संवाद घडला. पण आश्चर्य असं की पुढच्या वर्षी झाडाला आंबेच आंबे लगडले."
     झाडांमध्येसुद्धा प्राण असतो. संवेदना असते. तेही घाबरते. त्याच्यातही आत्मा वास करत असतो. ही काही आजची गोष्ट नाही. आपल्याला सांगितलं जातं की अमूक एक काम केलं की पुढच्या जन्मी या वृक्षाचा जन्म मिळतो. तर तमुक काम केलं की त्या वृक्षाचा जन्म मिळतो.वृक्ष तोडण्याच्या कृतीलाही पाप समजलं जातं. आजपर्यंत या दुनियेतला वृक्ष तोडणारा कुठलाही माणूस मोठा झाला नाही. लाकडे तोडून काही दिवस पैसेवाले होतात. पण ते फार काळ काही टिकत नाही. कारण जिवंत वृक्षावर जो कोणी कुर्‍हाड चालवेल, त्याचे दिवस भरलेच म्हणून समजा. मारण्याचा अधिकार फक्त परमेश्वराला आहे. कारण त्यानेच त्याला बनवले आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी मारेल तर त्याला शिक्षा होईल. एखाद्याला    वाणीनेही मारले जाऊ शकत नाही. मनाचाही प्रहार केला जाऊ शकत नाही. तर मग शरीराची गोष्टच सोडा.                     

No comments:

Post a Comment